Tuesday, May 12, 2020

तुळशीचे महत्त्व

     🌿🌿🌿🌿🌿🌿 🌿 तुळस  🌿🌿🌿🌿🌿🌿

      मानवी जीवनात तुळशीचे महत्व मोठे आहे कारण ती एकाचवेळी अनेक रोगांचे निर्मुलन करते. तुळशीचे ५ प्रकार आहेत. कृष्ण तुळस, दहीद्र तुळस, राम तुळस, बाबी तुळस आणि तुकाशामीय तुळस. उष्णतेच्या विकारात तुळशीचे बी पाण्यात भिजत घालून त्याची खीर घेतात. अर्धांगवायू आणि संधिवात यात तुळशीच्या पानांच्या काढ्याची वाफ घेतात. निद्रानाशावर काळ्या तुळशीच्या पानांच्या गोळ्या घेतात. एकाग्रता वाढवण्याचा गुण हि तुळशीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या पानांच्या सेवनाने विशेष उपोयोग होओ. प्रसिद्ध चिकित्सक डोक्टर उपेन्द्र रे यांनी संशोधनाने सिद्ध केले आहे कि तुळशीच्या पानात *कर्करोग , हृदयरोग, किड्नीचे विकार आणि त्वचा रोग बरे करण्याची अपूर्व शक्ती आहे.* बारीक ताप, खोकला, सर्दी या विकारात तुळस गुणकारी आहे तसेच तुळशीची पाने डासांना दूर पळवितात.
प्रख्यात निसर्ग उपचार तज्ञ श्री.कार्तिकेय महादेविया म्हणणतात तुळशीची पाने दही किंवा गोड ताकाबरोबर खाल्ल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊन शरीर प्रमाणबद्ध राहते आणि वजन कमी होऊन शरीर प्रमाणबद्ध राहते आणि वजन कमी झले तरी थकवा येत नाही. तुळशीत मानसिक ताण कमी करण्याचा हि गुण आहे.
मूळव्याध, दम, कोरडी खरुज , कावीळ, केस गळणे, क्षयरोग अश्या अनेक रोगांवर तुळस गुणकारी आहे. या गुणांमुळेच आज जगभर तुळशीवर विशेष संशोधन होत असून तुळशीच्या अर्कापासून सिरप , गोळ्या आणि तेल बनवण्यात येते. तुळशीचा चहा हि निसर्गौपाचारातील एक खास निर्मिती आहे.
आपल्या अंगणात तुळशीची विपुल झाडे लावली तर त्या झाडांच्या सहवासामुळे प्रतिकार शक्ती वाढून अनेक छोट्या रोगांपासून सुरक्षित राहता येते. रोज सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीच्या झाडासमोर बसून दिघ श्वसन केल्यास आरोग्य मिळेल. तुळशीतील या अलौकिक गुणधर्मामुळे आपल्याशी तिचा रोज संपर्क यावा म्हणून आपल्या पूर्वजांनी अनेक व्रत वैक्ल्यात तुळशीचा समावेश केला आहे.
वैशाखातील शुद्ध प्रतिपदेला आणि संक्रांतीच्य दिवशी तुळशीला अभिषेक करतात. वैशाखात रोज तुळशीला पाणी घातल्यास अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळते असे म्हणतात. जो मनुष्य रोज तुळशीला दुधाने अभिषेक करतो त्याचे आरोग्य चांगले राहते आणि त्याच्याकडे लक्ष्मी नांदते. जो उन्ह्याळ्यात तुळशीला पाणि देतो त्याची सर्व पापे धुतली जातात असे शास्त्र वाचन आहे.
कार्तिक शुद्ध द्वादशी पासून पौणिमे परेंत तुळशीचा श्री कृष्णाशी विवाह लावण्याची पद्धत आहे. तुलसी विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य मिळते व मोक्ष प्राप्ती होते. ओरिसातील कुमारिका अश्विनी पौणिमेच्या दिवशी संध्याकाळी तुळशीजवळ चंद्राची पूजा करतात. त्यामुळे चांगला पती मिळतो अशी भावना आहे. आपल्याला एकादी वस्तू देवाला अर्पण करावयाची असेल तर ती तुळशीच्या मुळापाशी अर्पण करतात. म्हणजे ती वस्तू ईष्ट देवतेकडे पोहचते अशी समजूत आहे.
आपल्या देशाप्रमाणे ग्रीस देशात अजूनही *संत बेसिल डे* नावाचा उत्सव साजरा करतात. या दिवशी तेथील स्त्रिया घरात तुळस आणून तिची पूजा करतात.
कार्तिक महिन्यात तुळशीने विष्णूची पूजा केल्यास त्याला विशेष महत्व आहे. पूर्वीच्या काळी घरोघरी संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावण्याची पद्धत होती तसेच सकाळी तुळशीला पाणी घालून तिला प्रदक्षिणा घालत त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होत असे. वारकरी स्त्रिया तुळशीची माळ गळ्यात घालून तसेच डोक्यावर तुळस घेऊन वारीला जातात. प्रवासाला जाताना तुळशीला उजवीकडून प्रदक्षिणा घालतात त्यामुळे प्रवास निर्विघ्न पार पडतो अशी समजूत आहे.
केरळमध्ये तुळशीला खूप महत्व आहे. तेथे प्रत्येक घरात तुळशीवृन्दावन असतेच. त्यांच्याकडे विवाह प्रसंगी वधु -वरांना तुळशीचे हार घालतात. ज्याच्या घरी तुळशीचे बन आहे ते घर तीर्थक्षेत्रासारखे समजतात.
तुळशीची महती सांगावी तेवढी थोडीच आहे. तुळशीचे मानवावर अनंत उपकार आहेत म्हणून *प्रत्येकाने आपल्या दारात तुळशीचे झाड लावण्याचे व्रत घेऊ या   
  🌺🌺🌺🌺   धन्यवाद🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

No comments:

Post a Comment