🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
👍👍लॉकडाऊनमुळे होणारे नुकसान व संधी 👍👍
😏😏 नुकसान 😏😏
*१. पर्यटन क्षेत्र -* लोक हौसेखातर फिरायचं कमी करतील. याचा परिणाम टुर्स ॲंड ट्रॅव्हल्सच्या कंपन्या, हॉटेल्सवर होईल. सगळ्यात जास्त नुकसान पर्यटन उद्योगाचेच होईल.
*२. तीर्थक्षेत्रे -* भारतात पर्यटन म्हणून लोक तीर्थक्षेत्रांना भेटी देतात. भक्तांमुळे मंदिरांना दक्षिणा स्वरूपात चांगला निधी मिळत असतो. कमी झालेल्या गर्दीमुळे भक्तांमार्फत मिळणाऱ्या देणगीचा ओघ कमी होईल.
*३. रेस्टॉरंट -* बाहेरचं खाणं लोक कटाक्षाणे टाळतील. छोट्या मोठ्या खानावळी, पावभाजी, भेळ इत्यादीचे ठेले, मोठे रेस्टॉरंटस या सगळ्यांवर परिणाम जाणवेल.
*४. बॅंकिंग सेक्टर -* लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग बंदच आहेत. त्याचा परिणाम लोकांच्या मिळकतीवर जाणवतोय. अनेकांच्या नौकऱ्या गेल्या असतील. अनेकांनी कर्जाचे हफ्ते थकवले आहेत. त्यामुळे बॅंकिंग सेक्टरला झळ जाणवेल.
*५. सार्वजनिक उत्सव -* गणेशोत्सव, नवरात्र, दहीहंडी, गावच्या जत्रा इत्यादी उत्सवाच्या ठिकाणी लोकांची रेलचेल पुर्वीपेक्षा कमीच असेल. या उत्सवांवर अवलंबून असलेल्या छोटेमोठ्या व्यावसायिकांना थोडीफार झळ पोहचेल.
*६. लग्न आणि समारंभ -* मध्यम आणि छोट्या शहरांत आजही १००० ते २००० लोक लग्नात आमंत्रित असतात. केटरिंग, मंडप, लॉन्स, कपडे या सगळ्यात नाही म्हणलं तरी एका लग्नातून २०-२५ लाखाची उलाढाल होते. आता लग्नसमारंभ निवडक लोकांमध्येच होतील. इव्हेंट क्षेत्राला फटका बसेल.
*७. नाट्यगृह आणि चित्रपटगृह -* नाट्यगृह आणि चित्रपटगृहांत सोशल डिस्टंसिंगच्या नावाखाली १ सीट सोडून बसायची व्यवस्था करावी लागणार असं वाचण्यात आलं. ही व्यवस्था कायमस्वरूपी नसली तरी काही दिवसांसाठी का होईना यामुळे नाट्यगृह, चित्रपटगृहांचे नुकसान होईल.
१. आरोग्य तपासणी आणि चाचणी केंद्र - लॉकडाऊन संपल्यानंतर कोरोना पण संपून जाईल असे नाही. कोरोना कुठेच जाणार नाहीये, आपल्याला या विषाणूसोबत रहायची सवय करून घ्यावी लागेल. अधुनमधुन लाट येतच राहील आणि अशावेळी चाचणी केंद्रांची गरज पडेल. सध्या चाचणी केंद्रांचे प्रमाण कमी आहे. सरकार ही केंद्रे वाढवण्यावर भर देईल. भविष्यात यात संधी राहील.
२. फुड डिलीव्हरी - लोक बाहेर जाऊन खायचं टाळतील पण बाहेरचं खाणं टाळणार नाहीत. फुड डिलीवरी वाल्यांचा धंदा वाढेल.
३. सुरक्षा साधनांची निर्मिती - मास्क, ग्लोव्हज, सॅनिटाईझर इत्यादीची मागणी वाढेल. या संबंधीत निर्मिती उद्योगांना अच्छे दिन आताही चालू आहेत, नंतरही राहतील.
४. वाहन उद्योग - चीनमध्ये लॉकडाऊन नंतर सार्वजनिक ठिकाणी इतर लोकांशी संपर्क येऊ नये म्हणून लोकांनी चारचाकी खरेदीवर जोर दिला. परिणामी त्यांचा वाहन उद्योग जोमात चालू आहे. भारतात आर्थिक मंदीची परिस्थिती सुधारल्यास वाहन उद्योगाला चांगले दिवस येऊ शकतात.
५. वाहतूक - सार्वजनिक वाहतूक टाळण्यासाठी लोक गाड्या घेतीलच याची शाश्वती नाही कारण सध्या असलेली मंदी. पण याला पर्याय म्हणून खाजगी वाहतूक (टॅक्सी, रिक्षा) याला मागणी वाढेल.
६. कोचिंग - शिक्षण क्षेत्रात ऑनलाईन क्लासेसमुळे शाळा, कॉलेजवर फारसा फरक जाणवणार नाही. कदाचित होमस्कुलिंगकडे कल वाढू शकतो. पण याचा परिणाम नगण्यच राहील. ऑनलाईन क्लासेस सुरू करून खाजगी शिकवणी वाल्यांना संधी उपलब्ध होऊ शकतात.
*धन्यवाद..!
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
👍👍लॉकडाऊनमुळे होणारे नुकसान व संधी 👍👍
😏😏 नुकसान 😏😏
*१. पर्यटन क्षेत्र -* लोक हौसेखातर फिरायचं कमी करतील. याचा परिणाम टुर्स ॲंड ट्रॅव्हल्सच्या कंपन्या, हॉटेल्सवर होईल. सगळ्यात जास्त नुकसान पर्यटन उद्योगाचेच होईल.
*२. तीर्थक्षेत्रे -* भारतात पर्यटन म्हणून लोक तीर्थक्षेत्रांना भेटी देतात. भक्तांमुळे मंदिरांना दक्षिणा स्वरूपात चांगला निधी मिळत असतो. कमी झालेल्या गर्दीमुळे भक्तांमार्फत मिळणाऱ्या देणगीचा ओघ कमी होईल.
*३. रेस्टॉरंट -* बाहेरचं खाणं लोक कटाक्षाणे टाळतील. छोट्या मोठ्या खानावळी, पावभाजी, भेळ इत्यादीचे ठेले, मोठे रेस्टॉरंटस या सगळ्यांवर परिणाम जाणवेल.
*४. बॅंकिंग सेक्टर -* लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग बंदच आहेत. त्याचा परिणाम लोकांच्या मिळकतीवर जाणवतोय. अनेकांच्या नौकऱ्या गेल्या असतील. अनेकांनी कर्जाचे हफ्ते थकवले आहेत. त्यामुळे बॅंकिंग सेक्टरला झळ जाणवेल.
*५. सार्वजनिक उत्सव -* गणेशोत्सव, नवरात्र, दहीहंडी, गावच्या जत्रा इत्यादी उत्सवाच्या ठिकाणी लोकांची रेलचेल पुर्वीपेक्षा कमीच असेल. या उत्सवांवर अवलंबून असलेल्या छोटेमोठ्या व्यावसायिकांना थोडीफार झळ पोहचेल.
*६. लग्न आणि समारंभ -* मध्यम आणि छोट्या शहरांत आजही १००० ते २००० लोक लग्नात आमंत्रित असतात. केटरिंग, मंडप, लॉन्स, कपडे या सगळ्यात नाही म्हणलं तरी एका लग्नातून २०-२५ लाखाची उलाढाल होते. आता लग्नसमारंभ निवडक लोकांमध्येच होतील. इव्हेंट क्षेत्राला फटका बसेल.
*७. नाट्यगृह आणि चित्रपटगृह -* नाट्यगृह आणि चित्रपटगृहांत सोशल डिस्टंसिंगच्या नावाखाली १ सीट सोडून बसायची व्यवस्था करावी लागणार असं वाचण्यात आलं. ही व्यवस्था कायमस्वरूपी नसली तरी काही दिवसांसाठी का होईना यामुळे नाट्यगृह, चित्रपटगृहांचे नुकसान होईल.
१. आरोग्य तपासणी आणि चाचणी केंद्र - लॉकडाऊन संपल्यानंतर कोरोना पण संपून जाईल असे नाही. कोरोना कुठेच जाणार नाहीये, आपल्याला या विषाणूसोबत रहायची सवय करून घ्यावी लागेल. अधुनमधुन लाट येतच राहील आणि अशावेळी चाचणी केंद्रांची गरज पडेल. सध्या चाचणी केंद्रांचे प्रमाण कमी आहे. सरकार ही केंद्रे वाढवण्यावर भर देईल. भविष्यात यात संधी राहील.
२. फुड डिलीव्हरी - लोक बाहेर जाऊन खायचं टाळतील पण बाहेरचं खाणं टाळणार नाहीत. फुड डिलीवरी वाल्यांचा धंदा वाढेल.
३. सुरक्षा साधनांची निर्मिती - मास्क, ग्लोव्हज, सॅनिटाईझर इत्यादीची मागणी वाढेल. या संबंधीत निर्मिती उद्योगांना अच्छे दिन आताही चालू आहेत, नंतरही राहतील.
४. वाहन उद्योग - चीनमध्ये लॉकडाऊन नंतर सार्वजनिक ठिकाणी इतर लोकांशी संपर्क येऊ नये म्हणून लोकांनी चारचाकी खरेदीवर जोर दिला. परिणामी त्यांचा वाहन उद्योग जोमात चालू आहे. भारतात आर्थिक मंदीची परिस्थिती सुधारल्यास वाहन उद्योगाला चांगले दिवस येऊ शकतात.
५. वाहतूक - सार्वजनिक वाहतूक टाळण्यासाठी लोक गाड्या घेतीलच याची शाश्वती नाही कारण सध्या असलेली मंदी. पण याला पर्याय म्हणून खाजगी वाहतूक (टॅक्सी, रिक्षा) याला मागणी वाढेल.
६. कोचिंग - शिक्षण क्षेत्रात ऑनलाईन क्लासेसमुळे शाळा, कॉलेजवर फारसा फरक जाणवणार नाही. कदाचित होमस्कुलिंगकडे कल वाढू शकतो. पण याचा परिणाम नगण्यच राहील. ऑनलाईन क्लासेस सुरू करून खाजगी शिकवणी वाल्यांना संधी उपलब्ध होऊ शकतात.
*धन्यवाद..!
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
No comments:
Post a Comment